मुख्य सामग्रीवर वगळा

शृंगार २

          आपली नक्की काय चूक होते आहे तेच समजत नव्हत . आपण बायकोला पुरेसा वेळ देऊ शकत नाही हेच चुकत असाव बहुतेक . आधी कशी होती आणि आता कशी झाली आहे . किती इंटरेस्ट होता तीला . स्वतः हून पुढाकार घ्यायची , घरी आल कि स्वस्थ बसु द्यायची नाही . आणि आता काय झाल आहे तीच . आपण तिला दोष देण्यात काही अर्थ नाही . आपण आपल्या पासुनच सुरूवात करूया . आजकाल  ऑफिसमध्ये इतका वेळ काम कराव लागत . हे तर होणारच आपण कुठे सरकारी नोकरांसारखे नशीबवान आहोत .
पुढे ती लोकल त्यातली ती गर्दी , सुरूवाती सुरूवातीला त्याचही थ्रील वाटायच . नंतर त्याची सवय झाली आणि आता तर उबग येतो त्याचा . एवढी माणस वाढली तेवढया लोकल नाही वाढल्या . आता काही दिवसांनी एकमेकांच्या उरावर बसून प्रवास करावा लागतो की काय कुणास ठाऊक . हं डबलडेकर लोकल नाही तर हा उपाय होईल . जाऊदे मी पण काय विचार करत बसलो . जो प्रश्न इतक्या वर्षात नाही सुटला तो आता काय सुटणार आहे . पण चांगला विचार आहे एकमेकांच्या उरावर बसून . पण यात वर  बसणा-याची मजा आहे , तेही खाली कोण आहे याच्यावर . बाकी खालच्याच मरणच आहे . आणि हा अनुभव तर रोजचाच आहे , बॉस बसलेलाच असतो रोज उरावर . आता लोकल शिवाय दुसरा इतका फास्ट आणि परवडणारा पर्याय नाही . त्यामुळे ते तर बदलता येणार नाही . दुसर म्हणजे ऑफिस तिथ काही तरी करून वेळ वाचवायला हवा . बाकीच नंतर पाहू पण आधी आठ एक दिवस रजा काढून कुठतरी फिरून येऊ . अगदी बाहेर नाही गेलो तरी घरी तरी राहू सोबत काही वेळ , तेवढाच चेंज . बघू एवढ्यातच थोडातरी फरक पडेल . आता ऑफिसमध्ये जाऊन पहिल हे काम करूया .  लोकल स्टेशनवर पोहोचली सोबत विचारही निर्णयाच्या स्टेशनवर पोहोचले होते . आता आनंदातच आपला मोर्चा ऑफिसकडे वळविला . ऑफिसमध्ये सर्व आलबेल आहे हे पाहून काही वेळाने बॉसच्या केबिनमधे गेलो . आणि बॉससमोर रजेचा विषय काढला . इतका वेळ शांत बसलेला कुत्रा अचानक अंगावर धाऊन आल्यासारख झाल . काही बचाव करता आला नाही  . छे काही कारण पण पुढ ठेवू दिल नाही . ह्या माणसाला काय बोलाव तेच कळत नाही . घरी बायकोशी भांडून येतो कि काय ऑफिसला कुणास ठाऊक . याच्या तर .... चार दोन शिव्या तरळून गेल्या जीभेवरून  . आता पुढे काय ? मोठा प्रश्न आ वासून उभा होता . काहीतरी करून वेळ काढणे गरजेचे होते . काय कराव आता ? पण मला प्रश्न पडतोय काय प्रॉब्लेम असेल बॉसचा ? काय असणार स्वतःच वैवाहिक जीवन सुखी नसेल म्हणून बघवत नसेल दुसऱ्याच . घरी कर्तबगारी दाखवण्यात कमी पडत असेल म्हणून इथे कर्तबगारी दाखवत असेल . घरी कमी पडतोय म्हणून बायको ओरडत असेल आणि त्याच फ्रस्ट्रेशन हा इथ काढत असेल . कमी पडतोय म्हणून बायको ओरडत असेल ; बाकी जास्त पडत असेल तरी बायको ओरडणारच . एकूण काय तर कमी किंवा जास्त पडो बायको ओरडणारच . बाकी पुरूष म्हणून उभ राहण हीच  कोणत्याही पुरुषाची सर्वात जास्त अभिमानाची गोष्ट . पण नुसत उभ राहूनही फायदा नाही , काम आणि रिझल्ट महत्त्वाचे . जाऊदे आपल काय चालल होत आणि हे काय . मग काय करु सरळ राजीनामा देऊन दुसरी नोकरी पहावी का ? छे हे फारच होईल .पण आयुष्य अस वाया घालवण्यात काय अर्थ आहे ? हो कितीही अघोरी वाटला तरी या शिवाय दुसरा मार्ग नाही आपल्याकडे . ठिक आहे हेच करू पण आधी कुणालातरी सांगून बघू . सावंत काकांकडे हा विषय काढला .
          " अरे वेडा झाला आहेस का तू ? अरे अशी कशी तडकाफडकी नोकरी सोडण्याचा विचार केलास ? हे बघ एक तर आपण काय IT वाले नाही कि कधीही आणि कितीही वेळा नोकरी सोडायला . तेही फार विचार करुनच करतात अस . आणि बघ तुला या वयात जो पगार मिळतो तो बराच जास्त आहे . इथून सोडून दुसरीकडे कुठ गेलास तर तुला इतका पगार मिळेल याची शाश्वती नाही आणि एक्सपिरियंस असला तरी तिथे तू नवखाच ना ? म्हणजे काम नक्कीच जास्त . अरे म्हणजे पगार कमी आणि काम जास्त . मुर्खपणाच नव्हे का हा ."
          अरेच्या ही गोष्ट माझ्या ध्यानातच आली  नाही कि काम वाढुही शकत आणि त्यामुळे वेळही . छे यात काहीच शाश्वती नाही वेळ वाचण्याची , उलट वेळ जास्त जाण्याची शक्यताच जास्त  .आणि नविन जागी तर मग फारस काही करताही येणार नाही . छे हे म्हणजे आगीतून फुफाट्यात गेल्यासारख होईल . बर झाल आपण आधी विचारल सावंत काकांना . काकांचे आभार मानले . मग कामाला लागलो . म्हणजे झाल आता नोकरी बदलणे हाही पर्याय गेला . फिरून परत पहिल्याच ठिकाणी पोहोचलो होतो . आता काय ? ठिक आहे मग आहे तो वेळ चांगल्या पद्धतीने वापरूया . थोडी फिटनेस वाढवूया , थोडा इंटरेस्ट वाढवूया , स्वतःचा आणि बायकोचाही . जिम जॉइन करूया . पण जिमसाठी वेळ कुठे आहे ? जाऊदे नाहीतरी आपण घरी जाऊन काय उपटतो ? उपटणे , कापणे का क्रीम काय कराव ? हे या क्षेत्रातले दिग्गज कसे अगदी क्लीन क्लीयर असतात तस कराव काहीतरी . पण काय करत असतील ?  उपटणे छे आतंकी पर्याय . कापणे ठिक आहे पण भलतच कापल तर अवघड व्हायच , आहे तेही हातच जायच . क्रीम कुणाला माहीत याच्यासाठी वेगळ असत का ते बायका हाता पायावरच्या केसांसाठी वापरतात तेच असत , कुणाला माहीत ? एकदा चौकशी करायला हवी . कुणाकड करावी चौकशी ? जाऊदे उगाच ओळखी पाळखीच्यात नको . मेडिकलमधे करुया चौकशी  , तेही जरा लांबच्या , उगाचच आपल अज्ञान नको जगापुढे . आपण इतक्या दिवसात अस काही वेगळ करण्याचा प्रयत्न केला नाही . नेहमी आपली तीच घिसीपिटी टेक्निक . घिसी आणि पिटी या पेक्षा  वेगळ काय करणार ? तेच ते पण जरा नये अंदाज मे .......



                                                                                                                                           ..... क्रमशः

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सावज (भाग ७)

त्या पावसाळी वातावरणात तो आला , त्याची गाडी बंद पडली होती . तिने त्याला थांबायला सांगितलं . त्या दोघांचं ट्युनिंग जमत होत . पण अचानक काही झालं आणि तो तिच्यापासून दूर झाला . सकाळी फार काही न बोलता तो गेला . त्याने तिला बाहेर भेटायला बोलावलं होत तिथेही काही घटना अशा घडल्या कि दोघांना तसंच माघारी यावं लागलं . बऱ्याच दिवसांनी त्याने तिला परत भेटायचं असल्याचं सांगितलं . तिने त्याला दुसऱ्या दिवशी बोलावलं . नंतर त्याच्या लक्षात आलं कि त्या दिवशी अमावस्या आहे त्यामुळे त्याने सकाळी लवकर जाऊन दुपारपर्यंत यायचं ठरवलं होत . पण जाताना त्याची गाडी बंद पडली आणि त्याला जायला उशीर झाला . तिथे पोहोचल्यावर ती त्याला नाही दिसली . कसल्याशा हालचालीने त्याच लक्ष वेधलं आणि तो तिकडे गेला . त्याला नंतर जाणवलं तो जंगलाच्या फार आत आला आहे . त्याने माघारी जाण्याचं ठरवलं आणि अचानक ती भेटली . ते दोघे माघारी आले . दोघेही आता एकमेकांमध्ये गुंफले जाण्यासाठी अधीर झाले होते . तिच्या त्या पाशवी रुपाला पाहून तो पुरता हबकला होता आणि मोठ्या मुश्किलीने त्याने स्वतःची सुटका करून घेतली . रस्त्याने जाताना अचानक त्याच्या डोक्यात...

सावज (भाग ६ )

त्या पावसाळी वातावरणात तो आला , त्याची गाडी बंद पडली होती . तिने त्याला थांबायला सांगितलं . त्या दोघांचं ट्युनिंग जमत होत . पण अचानक काही झालं आणि तो तिच्यापासून दूर झाला . सकाळी फार काही न बोलता तो गेला . त्याने तिला बाहेर भेटायला बोलावलं होत तिथेही काही घटना अशा घडल्या कि दोघांना तसंच माघारी यावं लागलं . बऱ्याच दिवसांनी त्याने तिला परत भेटायचं असल्याचं सांगितलं . तिने त्याला दुसऱ्या दिवशी बोलावलं . नंतर त्याच्या लक्षात आलं कि त्या दिवशी अमावस्या आहे त्यामुळे त्याने सकाळी लवकर जाऊन दुपारपर्यंत यायचं ठरवलं होत . पण जाताना त्याची गाडी बंद पडली आणि त्याला जायला उशीर झाला . तिथे पोहोचल्यावर ती त्याला नाही दिसली . कसल्याशा हालचालीने त्याच लक्ष वेधलं आणि तो तिकडे गेला . त्याला नंतर जाणवलं तो जंगलाच्या फार आत आला आहे . त्याने माघारी जाण्याचं ठरवलं आणि अचानक ती भेटली . ते दोघे माघारी आले . दोघेही आता एकमेकांमध्ये गुंफले जाण्यासाठी अधीर झाले होते .  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ किती मादक रूप होत तिचं जे त्याला तिच्याकडे खेचत होत . तो उतावीळ झाला होता . प...

शब्दभ्रमर (भाग २)

आता आताचीच तर गोष्ट आहे जेव्हा मी पहिल्यांदा या वाटेला गेलो होतो . तिला मानवायला आणि हवं ते मिळवायला ३ आठवडे लागले होते . म्हणजे तितके नसते लागले पण आपल्यालाच अनुभव नव्हता ना त्यामुळे सावधपणा बाळगला होता . आणि तिथून पुढे मग २ ३ ४ ... पुढे तर मोजायचच सोडून दिल . गाडी एकदम फुल स्पीड मध्ये होती . आतातर कित्तेक जणींची नावही आठवत नाहीत , ना चेहरे आठवत आहेत . त्यांना मात्र आपलं नावही चांगलं आठवत , चेहराही आणि सोबत घालवलेले क्षणही . खरच मुली मूर्ख असतात . पण असं डायरेक्ट नाही म्हणायच , त्या इमोशनल असतात . या वाक्याने त्याच्या ओठावर एक हसू आलं. परवा पाहिलेली एक पोस्ट त्याला आठवली ' प्रेमात त्रास कुणाला होतो मुलांना/मुलींना ' काय मूर्ख असतात लोक अनुभव काही नसतो आणि फुकटची पोस्ट करत राहतात . तस बघायला गेलं तर याच उत्तर आहे ' जो गुंततो त्याला त्रास होतो आणि जो गुंतत नाही त्याला कसलाच त्रास होत नाही . आणि बऱ्याच जणांना गुंतायचं नाही म्हटलं तरी ते नकळत कधी गुंततात ते नाही कळत . पण जर मनापासून प्रेम करून त्यात यश नाही मिळालं तर मात्र तो किंवा ती शक्यतो नाही गुंतत कशातच प्रॅक्टिकल विचार ...