मुख्य सामग्रीवर वगळा

उत्तर

        आपल्या सोबत अस का होतय याच उत्तर त्याला काही केल्या मिळत नव्हत . आपण तर सगळ्यांसोबत चांगलच वागतो पण लोक आपल्याशी अस का वागतात ? नेहमीच आपल्याला गृहीत धरल जात . आपल्या मताचा , मनाचा कुणाला विचारच नसतो . आपली आठवण फक्त त्यांना गरज असेल तेव्हाच येते . अशावेळी हे सगळ्यात आधी आपल्यालाच विचारतात , पण जेव्हा त्यांची गरज संपते तेव्हा त्यांना आपली आठवणही येत नाही . तेव्हा त्यांना त्यांचे मित्र असतात . छे कुणाला मदत करावी की नाही . आयुष्यातही असच होतय सतत आपल्याला डावलल जात . त्याला त्याच्या चांगूलपणाची चीड आली होती . काय कराव किती प्रयत्न केले पण असच वागतो आपण दरवेळेस , हा आपला स्वभावच झाला आहे आणि तो बदलताही येत नाहीये . तो स्वतःशीच मनातल्या मनात बोलत होता , आणि आतून तडफडत होता . तेव्हढ्यात कुणीतरी पटकन जवळ आल , तो आपल्या विचारातून बाहेर येऊन कोण आहे ते पाहणार तेव्हढ्यात त्याच्या गळ्यावर काहीतरी अणकुचीदार वस्तू टेकवली गेली .



  " तुज्याजवळ जो काय पैसा आडका फोनबीन हाय ते बाहेर काढ , चल आटप लवकर . "

        तो खूपच घाबरला . त्याचे हात थरथरत होते . खिशातून पैसे काढायलाही येईनात नीटनीटके . खाडकन एक कानाखाली बसली .

  " ए आवर लवकर . "

         त्याने खिशातले होते नव्हते ते पैसे त्याला दिले .

  " हे काय हाय ही चिल्लर . "

  " जेव्हढे होते तेव्हढे दिले सगळे . "

  " ही दहाची नोट आन वर ही चिल्लर काय भिकारी समजलास का मला . "

  " अहो ते पैसे कमी पडत होते म्हणून मी मागच उतरलो आणि चालत निघालेलो . "

  " फोन ? "

  " आजच दुरुस्तीला टाकला . "

  " सगळ आजच झाल ? " "भडव्या "अस म्हणत त्यान त्याला झोडायला सुरूवात केली . चांगल झोडपल्यावर त्याच समाधान झाल असाव .

  " साला आज टाळक सटाकलय आणि हेच भेटायच होत . " म्हणत तो निघाला . इकड याला बरच लागल होत . तो जमीनीवर पडला होता . कपडे सगळे धूळीने माखले होते . कुठकुठ फाटलेही होते . हाताला खरचटल होत . गुढघे फुटले होते . ओठातून रक्त येत होत . तो हात टेकवून कसातरी उठायचा प्रयत्न करत होता तेव्हढ्यात त्याच्या हाताला काहीतरी लागल नेमक जिथे लागल होत तिथेच तो दगड लागला तो कळवळला पण क्षणभरच अचानक त्याच्या डोक्यात काहीतरी आल आणि तो ताडकन उठला त्याच्या हातात दगड होता . समोर तो पाठमोरा . दोन तीन ढेंगामधेच त्याच्यापाशी पोहोचला आणि हातातला दगड सरळ त्याच्या डोक्यात घातला . तो थेट जमीनीवर तडफडत पडला होता . तोच दगड उचलून परत परत .... किती वेळा मारत होता माहीत नाही .

         सकाळी उठल्यापासून सगळ अंग ठणकत होत . डॉक्टरकडे गेल्याशिवाय पर्याय नव्हता .

  " काय झाल मारहाण की काय ? " डॉक्टरांनी विचारल .

  " नाही पडलो . "

  " झेपेल एव्हढीच घ्यावी . दिवस चांगले नाहीत काल एकाचा खून झालाय दगडाने ठेचून . "
=====================================================

  " अहो एव्हढे होत नाहीत मी रोज येतो . "

  " ए एव्हढेच होतात एकदा सांगितल ना तूला . " रिक्षावाल्याचा आवाज चांगलाच चढला होता .

        रस्ता तसा बराच सामसूम होता . त्याला मागून  ढकलल तरीही त्याला फरक पडत नव्हता . त्याची नजर भिरभिरत होती काहीतरी शोधत होती . आता त्याचा शोध बहूदा पुरा झाला होता आणि नजर आता खिळली होती समोरच्या दगडावर . त्याला परत मागून ढकलल तसे त्याचे डोळे चमकले आणि ओठावर एक हसू  उमटल ......

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सावज (भाग ७)

त्या पावसाळी वातावरणात तो आला , त्याची गाडी बंद पडली होती . तिने त्याला थांबायला सांगितलं . त्या दोघांचं ट्युनिंग जमत होत . पण अचानक काही झालं आणि तो तिच्यापासून दूर झाला . सकाळी फार काही न बोलता तो गेला . त्याने तिला बाहेर भेटायला बोलावलं होत तिथेही काही घटना अशा घडल्या कि दोघांना तसंच माघारी यावं लागलं . बऱ्याच दिवसांनी त्याने तिला परत भेटायचं असल्याचं सांगितलं . तिने त्याला दुसऱ्या दिवशी बोलावलं . नंतर त्याच्या लक्षात आलं कि त्या दिवशी अमावस्या आहे त्यामुळे त्याने सकाळी लवकर जाऊन दुपारपर्यंत यायचं ठरवलं होत . पण जाताना त्याची गाडी बंद पडली आणि त्याला जायला उशीर झाला . तिथे पोहोचल्यावर ती त्याला नाही दिसली . कसल्याशा हालचालीने त्याच लक्ष वेधलं आणि तो तिकडे गेला . त्याला नंतर जाणवलं तो जंगलाच्या फार आत आला आहे . त्याने माघारी जाण्याचं ठरवलं आणि अचानक ती भेटली . ते दोघे माघारी आले . दोघेही आता एकमेकांमध्ये गुंफले जाण्यासाठी अधीर झाले होते . तिच्या त्या पाशवी रुपाला पाहून तो पुरता हबकला होता आणि मोठ्या मुश्किलीने त्याने स्वतःची सुटका करून घेतली . रस्त्याने जाताना अचानक त्याच्या डोक्यात...

सावज (भाग ६ )

त्या पावसाळी वातावरणात तो आला , त्याची गाडी बंद पडली होती . तिने त्याला थांबायला सांगितलं . त्या दोघांचं ट्युनिंग जमत होत . पण अचानक काही झालं आणि तो तिच्यापासून दूर झाला . सकाळी फार काही न बोलता तो गेला . त्याने तिला बाहेर भेटायला बोलावलं होत तिथेही काही घटना अशा घडल्या कि दोघांना तसंच माघारी यावं लागलं . बऱ्याच दिवसांनी त्याने तिला परत भेटायचं असल्याचं सांगितलं . तिने त्याला दुसऱ्या दिवशी बोलावलं . नंतर त्याच्या लक्षात आलं कि त्या दिवशी अमावस्या आहे त्यामुळे त्याने सकाळी लवकर जाऊन दुपारपर्यंत यायचं ठरवलं होत . पण जाताना त्याची गाडी बंद पडली आणि त्याला जायला उशीर झाला . तिथे पोहोचल्यावर ती त्याला नाही दिसली . कसल्याशा हालचालीने त्याच लक्ष वेधलं आणि तो तिकडे गेला . त्याला नंतर जाणवलं तो जंगलाच्या फार आत आला आहे . त्याने माघारी जाण्याचं ठरवलं आणि अचानक ती भेटली . ते दोघे माघारी आले . दोघेही आता एकमेकांमध्ये गुंफले जाण्यासाठी अधीर झाले होते .  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ किती मादक रूप होत तिचं जे त्याला तिच्याकडे खेचत होत . तो उतावीळ झाला होता . प...

शब्दभ्रमर (भाग २)

आता आताचीच तर गोष्ट आहे जेव्हा मी पहिल्यांदा या वाटेला गेलो होतो . तिला मानवायला आणि हवं ते मिळवायला ३ आठवडे लागले होते . म्हणजे तितके नसते लागले पण आपल्यालाच अनुभव नव्हता ना त्यामुळे सावधपणा बाळगला होता . आणि तिथून पुढे मग २ ३ ४ ... पुढे तर मोजायचच सोडून दिल . गाडी एकदम फुल स्पीड मध्ये होती . आतातर कित्तेक जणींची नावही आठवत नाहीत , ना चेहरे आठवत आहेत . त्यांना मात्र आपलं नावही चांगलं आठवत , चेहराही आणि सोबत घालवलेले क्षणही . खरच मुली मूर्ख असतात . पण असं डायरेक्ट नाही म्हणायच , त्या इमोशनल असतात . या वाक्याने त्याच्या ओठावर एक हसू आलं. परवा पाहिलेली एक पोस्ट त्याला आठवली ' प्रेमात त्रास कुणाला होतो मुलांना/मुलींना ' काय मूर्ख असतात लोक अनुभव काही नसतो आणि फुकटची पोस्ट करत राहतात . तस बघायला गेलं तर याच उत्तर आहे ' जो गुंततो त्याला त्रास होतो आणि जो गुंतत नाही त्याला कसलाच त्रास होत नाही . आणि बऱ्याच जणांना गुंतायचं नाही म्हटलं तरी ते नकळत कधी गुंततात ते नाही कळत . पण जर मनापासून प्रेम करून त्यात यश नाही मिळालं तर मात्र तो किंवा ती शक्यतो नाही गुंतत कशातच प्रॅक्टिकल विचार ...